गुहागर : वेळंब गुरववाडीत कौटुंबिक वादातून ५२ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
179 Views

गुहागर: तालुक्यातील वेळंब गुरववाडी येथे कौटुंबिक वादातून एका ५२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरच्या पाठीमागे शिवणीच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी रात्री अकरा ते बुधवारी, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी सकाळी सात वाजण्याच्या मुदतीत हा प्रकार घडला. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी महेश मधुकर तांबे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबर देणार यांचे मोठे भाऊ लक्ष्मण मधुकर तांबे (वय ५२ वर्षे, रा. वेळंब गुरववाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हे आपल्या कुटुंबासह राहत होते. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण तांबे यांचा मुलगा संकेत याच्यासोबत काही कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादाच्या मानसिक तणावातूनच त्यांनी रात्री अकरा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घराच्या पाठीमागे असलेल्या शिवणीच्या झाडाच्या फांदीला दोरीने गळफास लावून घेतला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बुधवारी दुपारी १२.२३ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक ३१/२०२६) करण्यात आली असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल किंवा संबंधित तपास अधिकारी अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -
Total Visitors :
4610031
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *