CWG 2026 : वेटलिफ्टर मीराबाई चानूने 48 किलो गटात सुवर्णपदक पटकावले

Gramin Varta
26 Views

दिल्ली: भारतीय वेटलिफ्टिंगची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैखोम मीराबाई चानूनं आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारताचा तिरंगा उंचावला आहे.

ग्लासगो येथे सुरू असलेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) महिलांच्या 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने 85 किलो वजन उचलून इतिहासात आपलं नाव कोरलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील हे तिचं सलग तिसरं सुवर्णपदक असून, तिनं नव्या विक्रमासह इतिहास रचला आहे. तसेच 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं आहे.

मीराबाईनं आपल्या तिसऱ्या प्रयत्नात सहजपणे 85 किलो वजन उचलून एक नवीन राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला. आधी तिनं 82 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा (CWG) विक्रम प्रस्थापित केला होता आणि आता 85 किलो वजन उचलून एक नवीन राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (CWG) इतिहासात कोणत्याही खेळाडूनं उचललेलं हे सर्वाधिक वजन आहे. हे केवळ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपुरतं मर्यादित नाही. कोणत्याही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रकुल देशातील कोणत्याही खेळाडूनं प्रस्थापित केलेला हा सर्वोच्च विक्रम आहे.

मीराबाई चानू 82 किलो वजन उचलण्याच्या आपल्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरली. बारबेल डोक्यावर उचलल्यानंतर, ती सरळ उभी राहू शकली नाही. दोन वेळची राष्ट्रकुल विजेती मीराबाई सुरुवातीला आपलं वजन सांभाळत असल्याचं दिसत होतं, परंतु अखेरीस तिचा तोल गेला आणि तिला वजन खाली टाकावं लागलं.

सुवर्णपदक पटकावल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मीराबाई चानूनं म्हटले की, मला आज खूप चांगले वाटत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत माझा हा तिसरे सुवर्ण पदक आहे. मी खूपच खूश आहे. एवढी खूश आहे की सांगू शकत नाही. सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकले आहे. मी भारत आणि वेटलिफ्टिंग फेडरेशनसाठी खूप अभिमान व्यक्त करत आहे. भारतासाठी पदक आणू शकले, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, मी खूप खूश आहे.

Total Visitors :
4590859
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *