बोगस जाहिरातीवर विश्वास ठेवू नका; भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन

Gramin Varta
133 Views

रत्नागिरी : सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख (Land Records) विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरत आहेत. मात्र, ही भरती पूर्णपणे बोगस असून, नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सचिन इंगळे यांनी केले आहे.

सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भूमी अभिलेख विभागात नोकरीच्या सुवर्णसंधी असल्याच्या जाहिराती आणि मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा अधीक्षक श्री इंगळी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.

इंगळी यांनी सांगितले, “अशा प्रकारच्या कोणत्याही बोगस जाहिरातींवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. जर या जाहिरातींच्या अनुषंगाने कोणाला नियुक्ती पत्रे मिळाली असतील, तर त्यांनी थेट भूमी अभिलेख कार्यालयात येऊन त्याची सत्यता तपासून घ्यावी.”
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा बोगस जाहिराती पसरवून किंवा नियुक्ती पत्रांच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या लोकांविरुद्ध नागरिकांनी त्वरित संबंधित पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक श्री इंगळी यांनी केली आहे.
नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता अधिकृत माहितीसाठी शासकीय संकेतस्थळांचा किंवा कार्यालयाचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *