मुंबई: पूर्वांचलमधील प्रवाशांसाठी एक मोठी पर्वणी म्हणून दादर-गोरखपूर रेल्वे सेवेला नियमित एक्सप्रेस ट्रेन म्हणून चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रातून याला दुजोरा देण्यात आला आहे.
मात्र यामुळे कोकणवासियांवर अन्याय झाला आहे. ज्या गाडीसाठी कोकणवासियांनी लढा दिला ती दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनतेची सोय लक्षात घेऊन विशेष गाडी क्रमांक 01027/01028 च्या नियमित संचालनास मंजुरी देण्यात आली आहे. ही गाडी आता गाडी क्रमांक 11047/11048 दादर-गोरखपूर एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. हा निर्णय दीर्घकाळापासूनची जनतेची मागणी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दादर-गोरखपूर मार्गावरून मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि इतर प्रवासी नियमितपणे प्रवास करतात.
विशेष ट्रेनमुळे प्रवाशांना अनिश्चितता आणि मर्यादित उपलब्धतेचा सामना करावा लागत होता. आता नियमित एक्सप्रेसचा दर्जा मिळाल्याने प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि आश्वासक होईल. खासदार पुढे म्हणाले की, त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे हा मुद्दा अनेक वेळा ठळकपणे मांडला होता. प्रयत्न करत राहिले होते. अखेरीस, त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि केंद्र सरकारच्या सकारात्मक पुढाकारामुळे हा निर्णय शक्य झाला.
रेल्वेमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, हा निर्णय जनहितार्थ घेण्यात आला असून प्रवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी आणि सुविधा पुरवणे हा त्याचा उद्देश आहे. स्थानिक आणि प्रवासी या निर्णयाचे स्वागत करत आहेत. कारण त्यांच्या मते यामुळे मुंबई आणि पूर्वांचल दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, तसेच वेळेची आणि संसाधनांची बचत होईल. खासदार रवी किशन यांनी अखेरीस सांगितले की, ते परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहतील. विकासकामांना गती देण्यासाठी कटिबद्ध आहेत.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; कोकणवासीयांचा संताप






