रत्नागिरी: महावितरणच्या कोकण परिक्षेत्रातील आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा नुकत्याच जळगाव येथे पार पडल्या. या स्पर्धेत रत्नागिरी परिमंडलाने सादर केलेल्या ‘आवर्त’ या नाटकाने प्रथम पुरस्कार पटकावत विजेतेपदाचा मान मिळवला.
यावेळी विजेत्या नाट्यमंडळासोबत संचालक (मासं) राजेंद्र पवार यांनी छायाचित्र घेतले. तसेच, मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, आय. ए. मुलाणी, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे आणि इतर अधिकारीही उपस्थित होते. रत्नागिरी परिमंडलाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत रत्नागिरी परिमंडलाच्या ‘आवर्त’ नाटकाला प्रथम पुरस्कार

Leave a Comment