GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: रुंढे गावातील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

Gramin Varta
10 Views

“रुंढे वासियांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” – आमदार किरण सामंत

राजापूर: येथील ग्रामस्थांनी आज मोठ्या उत्साहात लोकप्रिय आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. गावातील शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रवेश सोहळ्यानंतर ग्रामस्थांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सामंत यांना निवेदन सादर केले. यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, “गावाच्या प्रगतीसाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत. रुंडे गावच्या सर्व विकासकामांना प्राधान्याने गती देण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.

गावातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आमदारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामस्थांचा शिवसेना प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित राहून आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांना विश्वास दिला की, “रुंढे वासियांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. गावाच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन.”

ग्रामस्थांच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात आमदारांना निवेदन देण्यात  जीआले. रस्ते, पाणीपुरवठा, शाळा व आरोग्य सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले.

या प्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ग्रामस्थांचा शिवसेनेत झालेला प्रवेश आणि आमदार सामंत यांनी दिलेला ठाम शब्द यामुळे रुंढे गावात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने गावाच्या विकासासंदर्भात  महत्त्वाचे निवेदन आमदार सामंत यांना सादर करण्यात आले. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा व आरोग्य या पायाभूत सोयींशी निगडित मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.यावर प्रतिसाद देताना आमदार सामंत म्हणाले, “रुंढे गावाचा विकास हा माझ्या प्राधान्यक्रमात असून गावातील प्रत्येक कामाला मी स्वतःहून गती देईन. रुंढेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला मी न्याय देईन,” असा शब्द त्यांनी रुंढेवासीयांना दिला.

गावातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश सोहळा उत्साहवर्धक ठरला असून, सामंत यांच्या वक्तव्यामुळे ग्रामस्थांमध्ये विकासाबाबत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राज कुरूप,तालुकाप्रमुख दीपक नागले, विभाग प्रमुख नार्वेकर,उपविभाग प्रमुख विश्वास दळवी, सरपंच नंदिनी कदम, अध्यक्ष तानाजी घाणेकर ,युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, जयदीप शिंगारे ,सदानंद बंडबे,रविंद्र सकपाळ चंद्रकांत बडबे, नानू शेठ आडीवरेकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ मुंबईकर मंडळी महिला वर्ग सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Total Visitor Counter

2649953
Share This Article