राजापूर : तालुक्यातील कणेरी गावातील यशवंत लक्ष्मण कणेरे (वय 65) हे मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरातून बाहेर पडले असून त्यानंतर ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी राजापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आहे.
राजापूर पोलिसांनी यासंदर्भात कणेरे यांचा फोटो आणि तपशील सार्वजनिक करत नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. संबंधित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ राजापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
राजापुरातील वृद्ध बेपत्ता






