GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत बाल विवाह मुक्त भारत अभियानांतर्गत रथयात्रेद्वारे जनजागृती

Gramin Varta
102 Views

रत्नागिरी:- महिला व बाल विकास विभागामार्फत बाल विवाह मुक्ती करिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महात्मा फुले मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने काल धनजी नाका बाजारपेठ गाडीतळ बस स्टँड रेल्वे स्टेशन इथपर्यंत रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी अतिश शिंदे, परिविक्षा अधिकारी अनिल माळी, संरक्षण अधिकारी (जिल्हास्तर) दिपाली चांदबोधले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृध्दी वीर, महात्मा फुले मंडळ सोलापूर या संस्थेच्या जिल्हा समन्वयक प्रेरणा सुर्वे, मुख्य सेविका कल्पना आंबवले, चाईल्ड हेल्प लाईन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर मधील सर्व अधिकारी / कर्मचारी व महात्मा फुले मंडळ, सोलापूर या संस्थेचे सदस्य साळवी कार्यक्रमास उपस्थित होते.

या रथयात्रेची सुरुवात करण्यापूर्वी बाल विवाह रोखणेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. बाल विवाह रोखा, मुलांचे भविष्य घडवा, शिक्षण हाच खरा अधिकार असा संदेश या रथ यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. बाल विवाह संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास 1098 यावर संपर्क करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रथयात्रा झाली.

Total Visitor Counter

3308572
Share This Article