GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब प्रथमच करणार ३०० किमीचा पंढरपूर प्रवास

रत्नागिरी : आषाढी वारीमधून पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी विविध दिंड्यांमधून पायी चालत वारकरी प्रवास करतात. त्याच भक्तिभावातून महाराष्ट्रातील सायकलप्रेमीही आपल्या सायकलवारीने हा प्रवास पूर्ण करतात. यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी ते पंढरपूर या सायकलवारीचे आयोजन केले आहे. २० ते २२ जून या दरम्यान ही वारी होणार असून यात दहा जण ३०० किमीचे अंतर पार करणार आहेत.

राज्यातून विविध ठिकाणचे सायकलिस्ट या वारीत सहभागी होत असतात. सायकलवारी ही संकल्पना नाशिक सायकल क्लबने सुरू केली. त्यांचे सर्वसाधारण ३०० ते ४०० सदस्य सायकलवर नाशिकहून पंढरपूरला यायचे. त्यातूनच पुढे या सायकलवारीचा जन्म झाला. सायकलवारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे. पहिल्या वर्षी सायकल वारीचे आयोजन पंढरपूर सायकल क्लबने केले होते. दुसऱ्या वर्षी नाशिक, तिसऱ्या वर्षी बारामती व यंदा लातूर सायकल क्लब करत आहेत.
प्रत्येक वर्षी पंढरपूर सायकल क्लब सर्व सायकलिस्टना सहकार्य करतो. पंढरपूरला ज्या दिवशीचे नियोजन आहे, त्या दिवशी पंढरपूरला सायकल वारी पोहोचते. तेव्हा सकाळी चहापानानंतर सहा वाजता नगर प्रदक्षिणा केली जाते. नंतर नाश्ता दिला जातो. त्यानंतर प्रत्येक सायकल क्लबचा काही विशेष कार्यक्रम असेल किंवा वर्षभरात राबवलेले उपक्रम असतील त्यावर चर्चा होते. विशेष कार्य करणाऱ्या क्लबचा सत्कार केला जातो. प्रत्येक सायकल क्लबला सन्मानपत्र दिले जाते. जेवणानंतर सायकलवारीची सांगता होते.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, अमित पोटफोडे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे, आरती दामले, अनुप मेंहदळे, ओंकार फडके, दर्शन जाधव हे वारीमध्ये सहभागी होणार आहेत.

Total Visitor

0201559
Share This Article
Leave a Comment