GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत वृद्ध महिलेचा रुग्णालयात मृत्यू

रत्नागिरी : निरूळ बौध्दवाडी येथील रहिवासी असलेल्या ६८ वर्षीय लता जाधव यांचा काल, १५ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मानेपासून छातीपर्यंत त्रास जाणवत होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निरूळ बौध्दवाडी येथीलच अस्मिता प्रदीप जाधव (वय ३०) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत लता जाधव या त्यांच्या आत्ये सासू होत्या. १५ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुपारचे जेवण करून लता जाधव या अस्मिता जाधव यांच्या घरी आराम करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना अचानकपणे मानेपासून छातीपर्यंत तीव्र वेदना होऊ लागल्या.
वेदनेने त्रस्त झालेल्या लता जाधव यांना तात्काळ औषधोपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2456113
Share This Article