GRAMIN SEARCH BANNER

जयगडच्या तैहसीन पांजरीने मिळवले कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये घवघवीत यश

Gramin Search
12 Views

रत्नागिरी: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे उत्तम उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील कुमारी तैहसीन तोसिफ पांजरी हिने घालून दिले आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रत्नागिरी येथून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेत तिने 91.77% गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, याआधीच्या वर्षीही तिने प्रथम क्रमांक पटकावला होता, ज्यामुळे तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीची प्रचिती येते.

तैहसीनचे हे यश केवळ तिचे एकटीचे नसून, तिच्या कुटुंबियांच्या त्याग आणि परिश्रमाचेही प्रतीक आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही आणि आई-वडील मत्स्यव्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतानाही, त्यांनी तैहसीनच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर सोडली नाही. तिच्या प्रत्येक पावलावर त्यांनी तिला साथ दिली.
या यशामागे तिच्या आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य आहे, असे तैहसीन अभिमानाने सांगते. शिक्षकांचे मार्गदर्शनही तिला वेळोवेळी मिळाले. अभ्यासात किंवा इतर कोणत्याही कठीण समस्येचा सामना करताना, आई-वडिलांच्या मदतीने तिने त्यावर मात केली. इतकेच नव्हे तर, काही समस्यांमध्ये किरण भैय्या सामंत साहेबांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्याचेही तिने कृतज्ञतेने नमूद केले.

कॉम्प्युटर इंजिनीअरिंगनंतर डिग्री मिळवून उच्च शिक्षण घेण्याचे तैहसीनचे स्वप्न आहे. तिच्या या यशाने तिच्या पुढील वाटचालीस बळ मिळाले असून, भविष्यात ती आपल्या ज्ञानाने समाजासाठी निश्चितच काहीतरी भरीव योगदान देईल अशी अपेक्षा आहे. तैहसीनच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Total Visitor Counter

2647863
Share This Article