रत्नागिरी : गणपतीपुळेहून मुंबईच्या दिशेने जाणारी बलेनो कार (क्रमांक MH04 PL 6985) फुणगुस गावाजवळील एका अवघड वळणावर ब्रेक न लागल्याने गाडी 40 फूट खोल दरीत कोसळली. गाडीची भीषणता पाहता मोठी दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
ही घटना दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. आघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त कार तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आली. या कामात स्थानिक तरुणांनी मोठे साहस आणि मदतीचे भाव दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली. साहिम खान, जितेंद्र थूल, कामिल मुल्ला, सुरज लांजेकर, जमीर नाईक, गजानन भोसले, सरफराज खान आणि प्रकाश भोसले या स्थानिकांनी मिळून अथक परिश्रम घेतले.
गणपतीपुळेहून मुंबईला जाणाऱ्या कारला फुणगुस येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
