GRAMIN SEARCH BANNER

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रस्तरीय तपासणी पथकाची सत्कोंडी ग्रामपंचायतीस भेट

Gramin Varta
64 Views

रत्नागिरी : २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झालेल्या स्वच्छ भारत मिशनचा टप्पा क्रमांक २.१ हा २ ऑक्टोबर २०२० ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविला जात आहे. याच टप्प्यातील “स्वच्छ सर्वेक्षण २०२५” अंतर्गत अखंड भारतातील काही निवडक ग्रामपंचायतींची पाहणी केंद्रस्तरीय पथकाद्वारे करण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातून निवड झालेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीची पाहणी रविवार, १३ जुलै २०२५ रोजी पार पडली.

या पाहणीदरम्यान शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतागृहे, दिव्यांग कुटुंबांची घरे, शोषखड्डे, कचरा विलगीकरण शेड, हँडवॉश स्टेशन, परसबाग निर्मिती, रस्ते सफाई, गांडूळखत प्रकल्प आणि गटारे यांची पाहणी करण्यात आली. यावेळी शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट कर्मचारी व गावकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.

केंद्रस्तरीय पथकात अमोल राजपूत, सविनय जाधव, अक्षय शिंदे सहभागी होते. पाहणीसाठी नांदीवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जाधव आणि सैतवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिर्के यांनी सहकार्य केले.

यावेळी सतिश थुळ, चंद्रकांत मालप, अरुण मोर्ये, श्रीकांत कुळ्ये, अजय काताळे, प्रणाली मालप, समिक्षा घाटे, ममता बंडबे, निकिता शिगवण, किरण बलेकर, विश्वनाथ बैकर, रोहीदास मालप, राजश्री गोताड, सुभाष पालये, सुशिल वासावे, महेश राहणे, प्रकाश मालप, चित्रा बैकर, कमल मालप, रूपाली घोसाळे, सुजाता खापले, नेहा पवार, संगिता मोर्ये, धनश्री पावरी, अमोल भोके, पूनम लाड, श्रीकांत खापले, रुपाली बैकर, सारिका खापले, सुनिता घवाळी आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3073057
Share This Article