रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून मंगळवारी पावसाने सर्वच तालुक्यांत दमदार हजेरी लावली आहे. आजच्या २४ तासांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ४१९.९५ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ४६.६६ मिमी पाऊस पडला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी शहरात सर्वाधिक ९१.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर गुहागर तालुक्यातही ७६.०० मिमी इतका दमदार पाऊस झाला आहे. राजापूरमध्ये ४६.६३ मिमी आणि दापोलीत ४५.०० मिमी पावसाने हजेरी लावली. खेड तालुक्यात ४१.७१ मिमी, संगमेश्वरमध्ये ३१.०८ मिमी, चिपळूणमध्ये ३०.८८ मिमी, लांजा तालुक्यात २९.४० मिमी आणि मंडणगडमध्ये २८.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असल्याने जनजीवन काहीसे संथ झाले असून प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
