रत्नागिरी: अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती रत्नागिरी शाखेने कालिदास दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या ‘पावसाच्या कविता’ या कविता वाचन समारंभाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजिका प्रा. डॉ. चित्रा मिलिंद गोस्वामी यांनी प्रास्ताविक केले व त्यांची लिखित पुस्तके मान्यवरांना स्वागतसमयी देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतील अनिल दांडेकर यांनी भूषविले. “लेखकाने आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमात प्रा. डॉ. चित्रा मिलिंद गोस्वामी (धो-धो पावसात भिजू दे), सेजल मेस्त्री (नाते दोन जीवांचे), मेधा मिलिंद कोल्हटकर (पानी), ज्ञानेश्वर कृष्णा पाटील (सप्तरंगी श्रावण), डॉ. मंगल पटवर्धन (श्रावण पाऊस), सचिन सनगरे (पाऊस ज्याचा त्याचा), सचिन सदानंद काळे (शेतकऱ्याचा पाऊस), प्रा. दत्तात्रय कांबळे (ती, मी आणि पाऊस), श्रेया जयसिंग लोहार (पावसातील नभ), मानवी सुनील होरंबे (पाऊस), उमेश नामदेव मोहिते (पाऊस), मानसी प्रसाद गानू (बहर सृष्टीचा), सायली बारगोडे (सुन बारिश कैसे शुक्रिया करू?), वसुंधरा जाधव (भिजते क्षण), सुनेत्रा विजय जोशी (सृजनाचे गाणे), उमा जोशी (आला पाऊस भरून), फाईजा सरफराज सय्यद (बरसात : कमाल भी, निराश भी), अदिबा अशरफ नाकाडे (बरसात कुछ कह गयी), विस्मया कुलकर्णी (झाले साक्षीदार मी) या कवींनी हिंदी, मराठी कविता सादर केल्या.