GRAMIN SEARCH BANNER

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शेखर निकमांनी अधिवेशनात मांडले महत्वाचे मुद्दे

Gramin Search
50 Views

रो-रो सेवा, पर्यटनवाढ, जलमार्ग, पूरनियंत्रण, बंदरविकास, चिपळूण-कराड रेल्वे, सौरऊर्जा योजना, रत्नसिंधू योजनेवर टाकला प्रकाशझोत

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी कोकणातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाच्या गरजा यावर ठामपणे आवाज उठवला. रो-रो सेवा, पर्यटनवाढ, जलमार्ग, पूरनियंत्रण, बंदरविकास, चिपळूण-कराड रेल्वे, सौरऊर्जा योजना, शिक्षकांच्या रिक्त जागा, रत्नसिंधू योजना, आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.

मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यामुळे जनतेच्या नाराजीचा मुद्दा त्यांनी अधिवेशनात मांडला. दाभोळ-पेढे जलमार्ग, खाडी खोलीकरण आणि बंदरविकासासाठी तातडीच्या उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सौर पंप योजनेत सुधारणा, 30 वर्षे वापरात न आलेली अधिग्रहित जमीन शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी, आणि शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी नवीन योजना राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

चिपळूण शहरातील पुरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी २५ कोटींच्या आराखड्यास मंजुरी मिळावी, अशी त्यांनी स्पष्ट मागणी केली. त्यांच्या या सखोल आणि प्रभावी मांडणीमुळे कोकणच्या प्रश्नांना नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3073032
Share This Article