GRAMIN SEARCH BANNER

खेडमधील तरुणाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
17 Views

खेड : तालुक्यातील शिंगरी वरचीवाडी येथील कमल गणपत कदम (वय ४७) यांचा मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पायावरील एका किरकोळ जखमेपासून सुरू झालेला त्रास गंभीर बनत गेल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले होते. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही जखम बरी झाली नाही. दरम्यान ७ जुलै रोजी दुपारी १.१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

१५–२० दिवसांपूर्वी कमल कदम यांच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ एक जखम झाली होती. पुढील काही दिवसांत पाय काळसर पडू लागल्याने त्यांना २६ जून रोजी कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडत गेल्याने ३० जून रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सर जे. जे. रुग्णालय, मुंबई येथे हलवण्यात आले.

तपासणीअंती त्यांना त्याच दिवशी सायंकाळी ५.३२ वाजता दाखल करून घेण्यात आले. तिथे त्यांच्या डाव्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

Total Visitor Counter

3199284
Share This Article