मकरंद सुर्वे /संगमेश्वर
मुंबई मध्ये काम करण्याऱ्या कोकणातील मंडप कामगारांचा येन गणपती सणाच्या तोंडावर मंडप ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये काही मागण्यावरून ठिणगी पडली . या कामगारांनी ही बाब मनसेचे जितेंद्र चव्हाण यांच्या कानावर घातली . जितेंद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये दाखल होत या कामगारांना एकत्र करून प्रशासन ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये योग्य समनव्य साधत न्याय मिळवून दिला . कोकणातील या कामगारांनी जितेंद्र चव्हाण यांचे आभार मानले .
मुंबई मध्ये कोकणातील असंख्य कामगार मंडप मध्ये कामासाठी जातात .नुकतेच एन गणपती सणाच्या तोंडावर ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये कामाचा मोबदला आणि इतर मागण्यावरून वाद निर्माण झाला होता . हा वाद भोईवाडा पोलीसस्थानकापर्यंत पोहचला . या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत कडवई येथील मुंबईस्थित मनसेचे कार्यकर्ते संजय धामनाक, शांताराम राक्षे व योगेश कुवळेकर यांनी ही बाब जितेंद्र चव्हाण यांच्या कानावर घातली .
जितेंद्र चव्हाण यांनी तात्काळ मुंबई ला धाव घेत सर्व कामगारांची सभा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . या सभेला साडेसातशे कामगार उपस्थित होते . सभेनंतर सर्व कामगारांसह भोईवाडा पोलीस स्थानकावर धडक मारत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांची भेट घेतली . यावेळी सचिन कदम यांनी यशस्वी मध्यस्थी करत कामगार व ठेकेदार यांच्याशी समनव्य साधत यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले .
तसेच मुंबई नाका कामगार व मुकादम तसेच मुंबई डकोरेटर्स असोसिएशन मालक संघटना यांच्यामध्ये मनसेचे नेते श्री. संजय नाईक यांनी सकारत्मक चर्चा होऊन पगारवाढ व इतर समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आला. यावेळी चव्हाण यांचे निकटवर्ती संजय धामणाक,शेखर नलावडे , नंदकुमार फ़डकले परेश धामनाक, दिनेश चिले,मुकादम कृष्णा बेंडल , संजय सावंत , राम डिके,संतोष डिके , संजय पंडियार , विनोद बाटले,मंगेश सुर्वे, रूपा मादगे, शांताराम धूमक,श्रीपत वणगे , दिनेश घाणेकर आदी उपस्थित होते .
यानंतर मुंबई डेकोरेटर्स असोशियशन च्या वतीने मुंबई मध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून जितेंद्र चव्हाण,संजय नाईक, सुनील मोरे , आमदार कालिदास कोलंबकर, अजय चौधरी, महेश सावंत तसेच पोलीस प्रशासन यांचे आभार मानण्यात आले आहेत. मंडप कामगारांनीही अडचणीच्या वेळेत कामगारांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जितेंद्र चव्हाण आणि मान्यवरांचे आभार मानले .
फोटो -कामगाराशी चर्चा करताना जितेंद्र चव्हाण आणि मान्यवर
मुंबईमधील कोकणातील मंडप कामगारांना जितेंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने न्याय
