जिल्हापरिषद पाणीपुरवठा उपविभागाबात ग्रामस्थांमध्ये नाराजी
रत्नागिरी: ऐन पावसाळ्यात जांभारी गावात गेले सहा दिवस कळझोंडी धरणातुन पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर पाणी पाणी करायची वेळ आली, पाणी नसल्याने टँकरने ग्रामस्थ पाणी घेत आहेत.
जयगड विभागात 28 गावांना कळझोंडी धरणातुन पाणी पुरवठा केला जातो, धरणाचे काम झाले , धरण भरलेले आहे , परंतु जुन्या पाईप लाईन सिमेंट च्या पाईप च्या आहेत त्यांना सतत “एअर” पकडते , त्यामुळे टाक्या भरत नाहीत त्याकारणास्तव पाणीपुरवठा योग्यरित्या होत नाही, जांभारी च्या पाईप लाईन ला हा प्राँब्लेम सतत होतो , त्यामुळे सैतवडे, गुंबद च्या पाणीपुरवठ्याला अडचण होते.
जांभारी गावचे सरपंच आदेश पावरी सतत पाठपुरावा करुनही समस्या सुटत नाही, पाणी मुबलक पुरवठा होत नाही, आणि आता तर गेले सहा दिवस पाणी पुरवठा नसल्याने सरपंच आदेश पावरी तसेच गावातील ग्रामस्थांमध्ये जिल्हापरिषद पाणीपुरवठा उपविभाग रत्नागिरी यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली,सहा दिवस पाणी पुरवठा नाही ही सतत ची अडचणीबाबत जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागाने गांभिर्याने दखल घेउन पाणीपुरवठा सुरळीत करावी , ही मागणी जांभारी च्या ग्रामस्थ आणि सरपंच आदेश पावरी यांची आहे.