GRAMIN SEARCH BANNER

संतोष देशमुख हत्या प्रकरण: कराडच्या ‎जामिनावर १८ ऑगस्टला सुनावणी‎

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी ‎वाल्मीक कराडच्या वतीने दाखल करण्यात ‎‎आलेल्या जामीन अर्जावर आणि इतर सहा ‎‎आरोपींनी केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर ‎‎सोमवारी(दि.४) सुनावणी होती.

याबाबत बचाव पक्षाकडून ‎‎युक्तिवादाची तयारी दर्शवली गेली. मात्र,‎विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल‎निकम हे राज्यसभा खासदार असल्याने व ते ‎‎सध्या संसदेच्या अधिवेशनात व्यस्त‎ असल्याने या युक्तिवादासाठी सरकारी पक्षाने ‎‎वेळ मागून घेतल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्ट ‎‎रोजी होणार आहे.‎ मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख ‎यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून ‎‎हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात सीआयडीच्या विशेष‎तपास पथकाने ८० दिवसांत ‎तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात ‎दाखल केले होते. या प्रकरणात मकोकाही ‎लावला गेला होता. त्यामुळे विशेष मकोका‎ न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.‎गेल्या सुनावणीवेळी आरोपी वाल्मीक ‎कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने ‎फेटाळला होता.‎ वाल्मीक कराडची बँक खातीही ‎गोठवली आहेत. याबाबत यापूर्वी‎ युक्तिवाद पूर्ण झालेला आहे.‎खात्यांचे फ्रिज काढण्याची‎ मागणी बचाव पक्षाने केलेली‎ आहे. मात्र याबाबत अद्याप ‎निर्णय झालेला नाही. सोमवारीही ‎न्यायालयाने निर्णय दिला नाही.‎ गत सुनावणीवेळी वाल्मीक‎कराडचा दोषमुक्तीचा अर्ज‎विशेष मकोका न्यायालयाने‎ फेटाळला होता. याविरोधात ‎आता वाल्मीक कडून उच्च‎न्यायालयात अपील केले जात ‎आहे. सोमवारी कराडचा मुलगा ‎अपील करण्यासाठी गेला. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा‎ अद्याप फरार आहे.‎ त्याच्याविरोधात ‎बीएनएसएस कलम ७२‎नुसार अटक वॉरंट ‎काढण्याची मागणी‎ सरकारी पक्षाकडून केली‎ गेली. याबाबतचा अर्ज‎ अ‍ॅड. कोल्हे यांनी‎ न्यायालयाला दिला.‎

Total Visitor Counter

2455990
Share This Article