GRAMIN SEARCH BANNER

भाडेवाढीमुळे रत्नागिरी एस.टी. आगार मालामाल; 4 महिन्यात दीड कोटींचे उत्पन्न

रत्नागिरी :एसटी महामंडळाने २५ जानेवारीपासून तिकीट दरात सुमारे १४.९५% भाडेवाढ केल्यामुळे रत्नागिरी एस.टी. आगाराच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील चार महिन्यांत आगाराला दीड कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे.

पूर्वी रत्नागिरी आगाराला रोज सरासरी ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते, तर आता ते ११ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ही वाढ मुख्यतः तिकिटांच्या दरवाढीमुळे झाली आहे.

दरवाढीमुळे: जवळच्या प्रवासासाठी १० ते २५ रुपये वाढ

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी १०० ते १५० रुपये वाढ

भाडेवाढीला राज्यभरातून विरोध झाला होता, तरीही महामंडळाने ती मागे घेतली नाही. परिणामी, रत्नागिरीसह आठ आगारांचे उत्पन्न वाढले आहे.

तरीही, ग्रामीण भागात एसटी बसचे महत्त्व अजूनही कायम आहे. नागरिक मुख्य गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही लालपरीलाच प्राधान्य देतात.

Total Visitor Counter

2474941
Share This Article