GRAMIN SEARCH BANNER

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला केंद्राची मंजुरी, १.७ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

Gramin Varta
28 Views

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने बुधवारी (दि.१६) तीन मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली आहे.यापैकी एक निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे.यामध्ये प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना, एनटीपीसी एनएलसी इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने बुधवारी (दि.१६) तीन मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली आहे.यापैकी एक निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे.यामध्ये प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना, एनटीपीसी एनएलसी इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.

कृषी अर्थव्यवस्था आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात देशाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ही पावले उचलली आहेत.

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे आहे. सूचना व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना फसल कापणीनंतरची साठवण क्षमता वाढवेल, सिंचन सुविधांमध्ये सुधारणा करेल आणि कृषी उत्पादनक्षमता वाढवेल. या योजनेसाठी केंद्रीय योजनांच्या समन्वयातून दरवर्षी २४,००० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाईल. २०२५-२६ पासून सहा वर्षे चालणाऱ्या या योजनेच्या अखत्यारीत देशातील १०० जिल्ह्यांचा समावेश केला जाईल.ही योजना नीती आयोगाच्या ‘आकांक्षी जिल्हे’ कार्यक्रमापासून प्रेरित आहे.

या योजनेचे उद्दिष्ट कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, शाश्वत कृषी पर्यायांचा अवलंब करणे, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर साठवण सुविधा वाढवणे, सिंचन व्यवस्था सुधारणे हे आहे. ही योजना ११ मंत्रालयांच्या ३६ योजनांच्या समन्वयातून राबविली जाईल, ज्यामध्ये राज्य सरकारे आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीच्या योजनांचाही समावेश असेल. कमी उत्पादकता, कमी पीक चक्र आणि कमी कर्ज वितरण अशा तीन प्रमुख निकषांच्या आधारे १०० जिल्ह्यांची निवड केली जाईल. प्रत्येक राज्यातील किमान एक जिल्हा समाविष्ट केला जाईल.या कार्यक्रमामुळे सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात विस्तार करण्यासाठी एनएलसी इंडिया लिमिटेड (एनएलसीएल) ला ७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे, एनएलसीआयएल त्यांच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक करू शकेल आणि त्या बदल्यात एनआयआरएल विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करेल.

याशिवाय, मंत्रिमंडळाने एनटीपीसी लिमिटेडला अक्षय उर्जा क्षेत्रात विद्यमान मर्यादेपेक्षा जास्त २०,००० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. ही गुंतवणूक एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) आणि त्यांच्या उपकंपन्यां आणि संयुक्त उपक्रमांद्वारे केली जाईल, जेणेकरून २०३२ पर्यंत ६० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करता येईल.

Total Visitor Counter

2652219
Share This Article