राजापूर/ तुषार पाचलकर: माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्री. सदाभाऊ खोत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ वाजता ते सीएसएमटी येथून कोकणकन्या एक्सप्रेस (रेल्वे गाडी क्रमांक २०१११) द्वारे राजापूर रोड, जि. रत्नागिरीकडे रवाना होणार आहेत. रविवार दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता त्यांचे राजापूर रोड रेल्वे स्थानकावर आगमन होणार असून, त्यानंतर सकाळी ६:३० वाजता त्यांचे तुळसवडे ता. राजापूर येथे आगमन होणार आहे.
या दौऱ्यादरम्यान सकाळी १० वाजता ओशिवले (गुरववाडी) माळ, ता. राजापूर जि. रत्नागिरी येथे ‘रॉयल ग्रुप, कोकण’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य चिखल नांगरणी स्पर्धा २०२६ या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांचे पाचल ता. राजापूर येथे आगमन होईल व राखीव भेटीनंतर दुपारी २ वाजता ते पाचलवरून अनुस्कुरा घाट – मलकापूर – शिराळा मार्गे ईश्वरपूरकडे रवाना होणार आहेत. मा. महोदयांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असून, त्यांच्या या दौऱ्यात स्वीय सहायक श्री. आदिनाथ कपाळे आणि व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी (PSO) श्री. विनोद हेमाडे हे सोबत राहणार आहेत.






