पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश
राजापूर : शिशण प्रसारक मंडळाच्या आरएसपीएम शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘हिरवी राखी आणि सलींची सखी’ या रम्य उपक्रमांतर्गत मक्याच्या कणसाच्या सालींचा वापर करून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या.
मक्याच्या कणसातील दाणे काढल्यानंतर उरलेल्या हिरव्या सालींची फुलं बनवून विद्यार्थ्यांनी विविध आकारांच्या आकर्षक पाकळ्या तयार केल्या. त्या पाकळ्यांना एकत्र करून पर्यावरणपूरक राख्या बनवण्यात आल्या. राखी बांधण्यासाठी लागणारा दोर रामभाऊ गव्हाणकर यांनी उपलब्ध करून दिला, तर फुलांच्या सालींचा साठा संदीप पाटील यांनी दिला.
हा उपक्रम आरएसपीएम शाळेचे मुख्याध्यापक निलेश पवार आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ सृजनशीलतेचा आनंद घेतला नाही, तर पुनर्वापराचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेशही दिला.
राजापूर : मक्याच्या सालीपासून विद्यार्थ्यानी बनवल्या इको-फ्रेंडली राख्या
