GRAMIN SEARCH BANNER

राजापूरचे माजी तहसीलदार सुरेश कदम यांचे निधन

Gramin Varta
16 Views

राजापूर: राजापूरचे माजी तहसीलदार आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुरेश सखाराम कदम (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने कणकवलीच्या खासगी रुग्णालयात निधन झाले.

सुरेश कदम बौद्धविकास सेवा संघ शिरवली मुंबई ग्रामीण मंडळाचे सल्लागार, शिरवल (ता.देवगड, सिंधुदुर्ग) येथील मूळचे रहिवासी होते. ते राजापूर येथे सात वर्षे तहसीलदार होते.

देवगड तहसीलदार कार्यालयात लिपिक म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. नंतर कणकवली पुरवठा निरीक्षक, त्यानंतर कणकवलीला शिरस्तेदार, वेंगुर्ले नगरपालिकेमध्ये प्रशासक, मालवणमध्ये तहसीलदार, राजापूरचे तहसीलदार, रायगड जिल्ह्यात तहसिलदार व तेथून नागपूरला उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली. तेथेच सेवानिवृत्त झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नात, भाऊ, भावजय व पुतण्या असा परिवार आहे.

Total Visitor Counter

2652201
Share This Article