GRAMIN SEARCH BANNER

अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, वाहतूक काही तासांसाठी ठप्प; प्रशासनाच्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरुळीत!

Gramin Varta
15 Views

राजापूर: रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे काही तासांतच हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आज पहाटेच्या सुमारास अनुस्कुरा घाटातील एका वळणावर अचानक मोठी दरड कोसळली. त्यामुळे रस्त्यावर माती आणि दगड मोठ्या प्रमाणात पसरले. अचानक रस्ता बंद झाल्याने दोन्ही बाजूंनी अनेक वाहनांच्या रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जे.सी.बी. वेळेवर पोहचण्यास थोडा विलंब झाला, तरीही युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. पोलिसांनी देखील घटनास्थळी पोहोचून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील आणि अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्याची खात्री झाल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांना काही काळ त्रास झाला, परंतु प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे मोठी गैरसोय टळली.

Total Visitor Counter

3073033
Share This Article