रत्नागिरी : जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विरोधात गेले अनेक महिने आंदोलने सुरु आहेत हि कंपनी ताबडतोब बंद व्हावी हि आग्रहाची मागणी असून त्यावर स्थानिक प्रशासन किंवा सरकार कडुन काहीच हालचाल होत नसल्याने या कंपनीच्या विरोधातील कोकण नागरी संघर्ष समितीतील शिष्ट मंडळाने आज ऍडव्होकेट आसीम सरोदे यांची रत्नागिरी येथे भेट घेतली व घडलेल्या सर्व घाटनांची माहीती दिली. हि कंपनी तात्काळ बंद व्हावी याकरिता आपली साथ मिळावी अशी मागणी केली यावर ऍडव्होकेट आसीम सरोदे यांनी सर्व आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याची ग्वाही दिली व या लढ्यात मी देखील सहभागी होणार असल्याचा शब्द दिला तसेच सर्व रत्नागिरीकरांना या लढ्यासाठी आर्थिक साहकार्य करण्याचे आवाहन केले.





