रत्नागिरी: तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील एका ३२ वर्षीय तरुणाने मानसिक आजाराच्या भरात विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साईनाथ नारायण बारगोडे असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी : मनोरुग्ण तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या







