GRAMIN SEARCH BANNER

माझ्या आणि राजमधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

Gramin Search
6 Views

मुंबई : बऱ्याच वर्षांनी राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. पंचाईत अशी आहे, की त्याने मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं म्हटलं आहे. साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे.

म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या मराठी हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो.. अशी करतोय. वैयक्तिक मला वाटतं, की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्रित दिसणं महत्त्वाचं आहे. ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरुन उपस्थिती लावली त्यांचे आभार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आम्हा दोघांमधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आज भोंदूबाबा-महाराज व्यस्त असतील, कोणी टाचण्या टोचतंय, कोणी अंगारे धुपारे करतंय, कोणी रेडे कापतंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

हिंदीसक्तीच्या विरोधातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मागे घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरेसेना यांच्याकडून वरळीत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वरळी डोम परिसरात मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे. या सोहळ्याला रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे असे कुटुंबीय उपस्थित आहेत. याशिवाय संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी, किशोरी पेडणेकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव

Total Visitor Counter

2652203
Share This Article