राजापूर/ तुषार पाचलकर: शिवसेनेने नेहमीच सामाजिक दायित्व स्वीकारत गोरगरीबांसाठी काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या समस्या लक्षात घेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत युवासेनेच्यावतीने तळवडे जिल्हा परिषद गटांतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. युवासेनेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
शिवसेना युवासेनेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात असून, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, लांजा-राजापूरचे आमदार किरणभैय्या सामंत, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना कोकण सचिव विकास गोगावले, राज्य कार्यकारिणी सदस्य अपूर्वा सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख अशपाकशेठ हाजू, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी आणि शिवसेना राजापूर तालुका प्रमुख श्री दीपकजी नागले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी तळवडे विभागातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना युवासेना सदैव कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव यांनी व्यक्त केला. युवासेनेच्या माध्यमातून करक व कारवली येथील जिल्हा परिषद शाळा करक नं. १, करक नं. २, करक नं. ३ तसेच कारवली नं. १ व कारवली नं. २ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासे, युवासेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, युवासेना तालुका समन्वयक सुरेश ऐनारकर, युवासेना विभागप्रमुख युवराज मोरे, महिला विभागप्रमुख श्वेता पवार, युवती सेना विभागप्रमुख विद्या लांजेकर, महिला शाखाप्रमुख श्रद्धा जाधव, युवासेना उपविभागप्रमुख राहुल गोसावी, युवासेना पदाधिकारी सुयोग जाधव, करक गावचे शाखाप्रमुख विशाल सुतार तसेच कारवलीचे शाखाप्रमुख वरेकर साहेब उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असून, भविष्यातही समाजहिताचे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






