पिक्चर अभी बाकी है म्हणत दिला इशारा
दिल्ली: निवडणूक आयोगाने यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकात निवडणूक आयोगाने जसे कारस्थान रचले होते तसेच षडयंत्र बिहारमध्ये देखील ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’च्या (एसआयआर) माध्यमातून करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संसद भवनाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, हे फक्त एका-दोन जागांचं प्रकरण नाही. अनेक मतदारसंघांमध्ये असं झालं आहे. हे राष्ट्रीय पातळीवर आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलं जात आहे. निवडणूक आयोगाला याची माहिती आहे. आधी आमच्याकडे पुरावे नव्हते, आता आहेत. आम्ही संविधानाचं संरक्षण करत आहोत, पण निवडणूक आयोग ‘एक व्यक्ती, एक मत’ या कर्तव्यात अपयशी ठरत आगे. याच वक्तव्यादरम्यान राहुल गांधी यांनी हसत हसत अजून पिक्चर बाकी आहे. असे सांगत सूचक इशारा दिला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी संसदेसमेर केलेल्या नाटकीय आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधीनी आरोपांचा पुनरूच्चार केला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, अनेक मतदारसंघांमध्ये गडबड चालू आहे. हे सगळे एक ठरवून, राष्ट्रीय पातळीवर आखलेले षड्यंत्र आहे. निवडणूक आयोगाला याबाबत माहिती असून, आता आमच्याकडे ठोस पुरावेही आहेत. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत आणि करत राहू, आम्ही थांबणार नसल्याचे राहुल म्हणालेत.
राहुल गांधींची मागणी काय आहे ?
मतदार यादीच्या बाबतीत राहुल गांधी म्हणतात की, वोट चोरी म्हणजेच मत चोरी करणं, हे ‘एक व्यक्ती, एक मत’ या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वावर हल्ला आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी स्वच्छ आणि अचूक मतदार यादी अत्यावश्यक आहे.त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली की पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा, जेणेकरून नागरिक आणि राजकीय पक्ष स्वतः त्याचे परीक्षण (ऑडिट) करू शकतील. यासोबतच राहुल गांधींनी एक संपर्क क्रमांकही प्रसिद्ध केला असून, नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं, असं आवाहन केलं आहे. याशिवाय, ते लवकरच संसद ते रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मतदार यादीच्या मुद्द्यावर सध्या सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू आहे.
राहुल गांधींचे निवडणूक आयोगाला पुन्हा आव्हान
