रत्नागिरी : तालुक्यातील जयगड नजीकच्या कांबळे लावगण येथे 32 वर्षीय तरुणाचा अकस्मिक मृत्यू झाला. संदेश सुर्यकांत बेलकर असे मृताचे नाव आहे. संदेश हा मुंबई येथे वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वी तो गावी आला होता.
11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तो राहात असलेल्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. यावेळी त्याला उपचारासाठी खंडाळा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद जयगड पोलिसात करण्यात आली आहे.
रत्नागिरी : कांबळे लावगणमध्ये तरुणाचा अकस्मिक मृत्यू
