GRAMIN SEARCH BANNER

आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प

Gramin Varta
22 Views

संगमेश्वर: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील प्रसिद्ध आंब्याच्या घाटात आज (१८ ऑगस्ट) सकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या पाच यंत्रांच्या मदतीने ही दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंब्याच्या घाटातील दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः, महामार्गाच्या रुंदीकरणासाठी डोंगराची केलेली कटाई यामुळे हा धोका अधिकच वाढला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरडी कोसळण्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत असले तरी, वाहतूक लवकर सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Total Visitor Counter

3199527
Share This Article