GRAMIN SEARCH BANNER

रायगड : मच्छीमारांना धोक्याची सूचना; मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये

Gramin Varta
11 Views

रायगड: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारी ही कायम असून, समुद्र खवळलेला आहे. त्यातच समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी 45 ते 50 किमी राहणार असून, तो प्रती ताशी 65 कि.मी.पर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील कोकण किनारपट्टीवर 22 ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधी दरम्यान समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी 45 ते 50 कि.मी. राहणार असून, तो प्रती ताशी 65 कि.मी. पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला आहे. या कालावधीत मच्छिमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात जावू नये, अशी सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छीमारांना करण्यात आली आहे.

या कालावधीत वित्त व जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्था, नौका मालक यांना याबाबत सूचित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसरात हवामान विभागाने अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर, सातारा घाट परिसरात अतिमुसळधार ते अतिवृष्टीची (ऑरेंज अलर्ट) शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2645850
Share This Article