GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: खुर्चीचा मोह नसलेले आमदार किरण सामंत; तेरवणमध्ये साधेपणाचे दर्शन

Gramin Varta
29 Views

दिलेली खुर्ची नाकारत ग्रामस्थांसोबत बसले चटईवर 

राजापूर (प्रतिनिधी) : खरा लोकप्रतिनिधी तोच, जो जनतेच्या सुखदु:खात सहभागी होऊन त्यांच्यासोबत जमिनीवर बसतो. राजापूर तालुक्यातील तेरवण बाईंगवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांच्या साधेपणाचे असेच एक अनोखे दर्शन घडले, ज्याने उपस्थितांची मने जिंकली.

१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात आमदार किरण सामंत सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहुण्यांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र स्थानिक ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने जमिनीवर बसले होते. ही गोष्ट आमदारांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी आपल्यासाठी ठेवलेली खुर्ची नाकारली आणि थेट ग्रामस्थांमध्ये जमिनीवर बसण्याचा निर्णय घेतला. “मीही तुमच्यातलाच आहे,” असा संदेश देत त्यांनी खुर्चीचा मोह बाजूला ठेवला आणि जनतेशी एकरूप होण्याचा आदर्श घालून दिला.

सत्तेची खुर्ची ही हक्काची असली तरी जनतेसोबत जमिनीवर बसून त्यांच्या भावना समजून घेणे आणि साधेपणा जपणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व असल्याचा संदेश त्यांच्या या कृतीतून दिसून आला. आमदार किरण सामंत यांच्या या लोकाभिमुख स्वभावाचे आणि साधेपणाचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले. “खुर्चीपेक्षा माणसांचा सन्मान मोठा आहे, हे आमदारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले,” अशा भावना एका गावकऱ्याने व्यक्त केल्या.

खऱ्या अर्थाने लोकांमध्ये मिसळून राहणारा लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे जिवंत उदाहरण आमदार किरण सामंत यांनी या प्रसंगातून सादर केले आहे, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या या कृतीने केवळ तेरवणमध्येच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात त्यांच्या साधेपणाची चर्चा सुरू झाली आहे.

Total Visitor Counter

3366873
Share This Article