GRAMIN SEARCH BANNER

बदलत्या काळात सायबर शिक्षण महत्त्वाचे : डॉ. अक्षय पाठक

Gramin Varta
21 Views

रत्नागिरी : बदलत्या काळात माणसाकडून होणाऱ्या चुकांमुळे सायबर गुन्हे घडतात. सायबर गुन्हे घडायचे नसतील, तर आपण जागरूक राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस हे प्रत्येकामध्ये निर्माण झाले पाहिजे. यासाठी सायबर शिक्षण महत्त्वाचे आहे. असे मत डॉ. अक्षय पाठक यांनी व्यक्त केले.  नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात आयोजित  मार्गदर्शन कार्यक्रमात सायबर सुरक्षा आपली जबाबदारी  या विषयावर डॉ. अक्षय पाठक बोलत होते.

या कार्यक्रमात पुढे बोलताना मोबाईल हा युवकांचा मित्र बनला आहे. आणि या मोबाईलच्या माध्यमातून अनेक गुन्हे घडतात वेगवेगळ्या प्रकारच्या फसवू नका घडतात. आपल्याकडून काही चूक झाल्यास यातून कसे मार्ग  काढायचे मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करून घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालू शकतो याबद्दलचे मार्गदर्शन डॉक्टर फाटक यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय गवाळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून या समाज माध्यमांचा वापर करताना जागरूक असणे आवश्यक आहे. माहितीचे आदानप्रदान करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक वृंद त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निकिता नलावडे तर आभार प्राध्यापक श्रेया राऊत यांनी मानले.

Total Visitor Counter

3368331
Share This Article