रत्नागिरी : शहरातील भाट्ये समुद्रकिनारी एक ५५ वर्षीय महिला बुधवारी (१६ जुलै) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पाण्यात बेशुद्धावस्थेत आढळून आली. स्थानिक रहिवासी तहा काद्री आणि माजी सरपंच पराग भाटकर यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तात्काळ महिलेची मदत करत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सध्या संबंधित महिलेवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तिची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती रत्नागिरी शहर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी बेशुद्धावस्थेत आढळली महिला
