नानासाहेब शेट्ये यांचे कला, क्रीडा, शेती व शिक्षण क्षेत्रात केलेले निःस्वार्थी काम आजही प्रेरणादायी

Gramin Varta
108 Views

नानासाहेब शेट्ये यांच्या ३३ व्या स्मृतिदिनी पुरस्कार, बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न; व्यक्ती आणि संस्था पुरस्कार प्रदान

संगमेश्वर :- कोंडगाव येथील थोर सुपुत्र, सर्वसामान्य नेतृत्व कै. नानासाहेब शेट्ये यांचे कला, क्रीडा, शेती व शिक्षण क्षेत्रात केलेले निःस्वार्थी काम आजही सर्वासाठी प्रेरणादायी असून कै. नानांनी सर्व लोकप्रतिनिधिंसाठी निःस्वार्थी समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे, असे प्रतिपादन राजापूर-लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण तथा भेय्या सामंत यांनी केले. ते साखरपा येथे आयोजित कै. नानासाहेब शेट्ये यांच्या ३३ व्या स्मृतिदिनी आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमूख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,  कै. नानांच्या स्मृती गेली तेहत्तीस वर्षे  विविध उपक्रमांनी जपल्या जात आहेत, त्यांच्या नांवे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव करुन तसेच उत्तम काम करणाऱ्या संस्थेला सुद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, हे निश्चितच गौरवास्पद आहे. कै. नानांचे हे श्रेष्ठत्व कायम स्वरुपी जपा असे आवाहन करून गुणवंत विद्यार्थी व पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्था यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

कै . नानासाहेब शेट्ये यांच्या ३३ व्या समृतिदिनाची सुरुवात कै. नानासाहेब शेट्ये, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना  पुष्पहार घालून करण्यात आलली.  यावेळी पंचक्रोशीतील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, सर्व शाखांमधून प्रथम आलेले विद्यार्थी तसेच कला व वाणिज्य शाखेत प्रथम आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा प्रमुख अतिथिच्या हस्ते गुलाबपुष्प , प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देवून गौरव करण्यात भरला.

यानंतर कै. नानासाहेब शेट्ये स्मृती पुरस्कारांचे वितरण आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. कै. नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती पुरस्कार २०२६ लांजा तालुक्यातील कोट गावचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम ऊर्फ आबा सुर्वे यांना तर कै. नानासाहेब शेट्ये स्मृती संस्था पुरस्कार खेड तालुक्यातील ग्रामविकास संघ, कुंभाड , मुंबई या संस्थेला प्रदान करण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख क. ३०००/- प्रत्येकी असे आहे . पुरस्कार प्राप्त व्यक्ती आबा सुर्वे यांनी माझ्या अमृतमहोत्सवी वर्षात मिळालेला आजवरचा सर्वात मोठा पुरस्कार असून, यामुळे अधिक उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळेल असे सांगितले, तर ग्रामविकास संघ कुंभाड , मुंबई या संस्थेचे प्रातिनिधी विजय भोसले यांनी माझ्या संस्थेच्या आजवरच्या कामाची दखल घेऊन आम्हाला सन्मानित केल्यामुळे  पुढील काळात संस्था आधिकाधिक उत्तम काम करेल असे भाश्वासन दिले.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उद्योगपती विष्णुशेठ रामाणे यांनी कै. नानासाहेब शेट्ये यांच्या आठवणींना उजाळा दिला.महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य  विजय बाईग यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. व्यासपिठावरील उपस्थित संस्थेचे सरचिटणीस संतोष केसरकर यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला.  यावेळी नाना मानकर, युयुत्सू आर्ते , नांनाचे विरंजीव रमाकांत शेट्ये, शेट्ये यांनी आपले समयोचित विचार मांडले.

याच कार्यक्रमात जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संदेश उर्फ बापू शेट्ये यांची नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल किरण सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणपत शिर्के यांनी केले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील असंख्य नागरीक, विद्यार्थी, लांजा व खेडे वरून आलेले अनेक नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाकांत शिंदे, मारुली शिंदे, रमाकांत शेट्ये , विरेंद्र शेट्ये, प्रसाद कोलते, दीपक शेट्ये यांनी मेहनत घेतली.

Total Visitors :
4654227
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *