GRAMIN SEARCH BANNER

मुंबईसह कोकण आणि विदर्भात पुढील ४ दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

Gramin Varta
15 Views

मुंबई: भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी कोंकण आणि विदर्भात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची ईशारा दिली आहे. त्याचबरोबर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मागील दोन दिवसांपासून मुंबईत अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे किरकोळ वाहतूक कोंडीची समस्या होत आहे, मात्र स्थिती सामान्य आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाने प्रभावित जिल्ह्यांतील प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोंकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात तेरणा नदीचे पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने खालच्या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन केले आहे. तथापि, अद्याप कोणत्याही ठिकाणाहून जीवितहानी अथवा मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही.

हवामान खात्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून, स्थानिक महापालिकांच्या साफसफाईमुळे पाणी साचण्याची समस्या उद्भवलेली नाही. तरीही, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे.

Total Visitor Counter

3379162
Share This Article